ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख कर्तव्य आहे. गावातील विहिरी, बोअरवेल, पाणी शुध्दीकरण यंत्रणा आणि जलसाठे यांच्या प्रभावी व्यवस्थापनाद्वारे पाण्याचा पुरवठा सुरळीत राखण्यात येतो. नळजोडणीचे देखरेख, गळती नियंत्रण, टाकीतून पाणी सोडण्याचे वेळापत्रक, तसेच पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते.
गावातील जलसंपत्तीचे संवर्धन, पावसाचे पाणी साठवणूक उपक्रम राबवणे, तसेच दुष्काळी परिस्थितीत पर्यायी पाणी व्यवस्थापन करणे हेही विभागाचे महत्त्वाचे कार्य आहे. शाश्वत जलव्यवस्थापनाद्वारे प्रत्येक घरापर्यंत पुरेसा आणि सुरक्षित पाणी पुरवठा पोहोचवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.